Posts

Showing posts from May, 2023

भाजीपाला, फळपिकांसाठी कर्ज वाटप शेतकरी कर्ज

Image
शेतकऱ्यांना तीस बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा ■ जिल्ह्यातील खासगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती अशा सुमारे तीस बँकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकयांना पीक कर्ज पुरवठा केला जातो. ■ यासाठी प्रति हेक्टर रक्कम निर्धारित केली जाते. त्याच्या मागणी आणि क्षेत्रानुसार पीक कर्ज वितरित केले जाते. सन 2023- 2024 या वर्षांसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये नवीन पीक कर्ज वाटप सुरु झाले आहे . गतवर्षीच्या तुलनेत यंदा उद्दिष्टात वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 85 टक्के इतकी होती. नाशिक जिल्ह्यासाठी 2022-2023 वर्षांत निर्धारित पीक कर्ज वाटप अधीक करण्यात येणार आहे.त्यापैकी 31 मार्चअखेर खुप मोठया प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात आले. कोणत्या पिकासाठी किती कर्ज? अन्य भाजीपाला : मिरची, टोमॅटो, कांदा, बटाटा, हळद, अद्रक, कोबी आदी पिकांसाठी पन्नास हजारांपासून सुमारे एक लाख पन्नास हजार पर्यंतचे कर्ज वितरित केले जाते. फळपिकांसाठी : ॲस्टर, झेंडू गुलाब, जॅस्मीन, मोगरा, निशिगंधा आदी फुलपिकांसाठी 50 हजार...

यश मिळावं यासाठी काय करायचं success चा मंत्र

Image
परिणामांशिवाय क्षमता निरुपयोगी आहे. क्षमता कशी वाढवली व सुधारली जाते? जेव्हा लोकांना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे कळते तेव्हा ती वाढते. त्यांना स्वतःकडून काय अपेक्षा आहेत हे त्यांना माहीत असते. आपल्या मर्यादा जाणा. कार्यक्षमतेत वाढ होते तेव्हा लोकांना माहित असते की यशानंतर बक्षिसे मिळतील. सर्वाधिक साध्य करणाऱ्यांना सर्वाधिक बक्षिसे. जिंकण्यासाठी जिद्द करा यशाच्या मार्गात अनेक प्रकारचे अडथळे, अडचणी आणि संकटे येतात हे खरे आहे, परंतु हे अडथळे व अडचणी व्यक्तीच्या दृढनिश्चयापुढे खुज्या होऊन जातात. ज्या व्यक्तीमध्ये दृढनिश्चय नसतो, तो यशाच्या मार्गावर काही पावले चालतो पण थकून बसतो. दृढनिश्चय ही यशाची पहिली अट आहे. ज्याचा निश्चय पक्का असतो तोच आपले ध्येय साध्य करतो. वेळेवर काम करण्याच्या सवयी लावा महत्त्वाचे काम ठराविक वेळेत करण्याची सवय लावण्याचे अनेक फायदे आहेत. ते काम करण्यात तुम्हाला आळस वाटत नाही. तुम्ही सवयीने ते करण्यात गुंतून जाता. एकदा का तुमची सवय झाली की तुमचे शरीर-मन पूर्णपणे सक्रिय होऊन सहकार्य करतात. तुम्हाला आनंद मिळतो, ज्यामुळे काम सोपे होते. कालांतराने ते काम अधिक चांगले...

प्रधानमंत्री मुद्रा योजना स्टार्टअप CGTMSE MSME आणि स्टार्टअपसाठी पाच योजना

Image
 भारत सध्या स्टार्टअप इकोसिस्टमसाठी तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि विविध क्षेत्रांच्या -वाढीला पाठिंबा देण्यासाठी सरकारने अनेक योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. १. प्रधानमंत्री मुद्रा योजना : या योजनेंतर्गत दहा लाख(10 lakh) रुपयांचे कर्ज हे कार्यरत भांडवल म्हणून देण्यात येते.. त्याची परतफेड पाच ते सात वर्षांची असते. २. क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फंड (CGTMSE) या योजनेंतर्गत पाच कोटीपर्यंत क्रेडिट स्टार्टअपसाठी प्रदान केले जाते. या कंपन्या सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि किरकोळ व्यापार क्षेत्र वगळून उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रात गुंतलेल्या असाव्यात. 50 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 75 टक्के credit गॅरंटी कव्हर व 50 लाख ते 5 कोटीपर्यंतच्या कर्जासाठी 50 टक्के क्रेडिट गॅरंटी कव्हर असते. ३. स्टँडअप इंडिया : याअंतर्गत महिलांना व एससी/ एसटी समुदायांना सुमारे 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या बँक कर्जाची सुविधा आहे. यात 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्कता नाही. 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण लागते. कर्जाची परतफेड सात वर्षामध्ये ...